व्यंकटनाथ महाराज हे नाथपंथातले थोर योगी होते. आज-काल रामदेव बाबांना लोक थोर योगी मजतात. पण ते विविध आसने करणारे संन्यासी आहेत. असनं करून कोणी योगी होत नाही. स्वतःच्या शरीरावर, शिष्याच्या, भक्ताच्या अथवा अपरिचिताच्या शरीरावर देखील ज्यांचे नियंत्रण असते ते योगी असतात.
नुसताच शरीरावर नाही तर ब्रह्मांडातील सर्व वस्तूंवर योग्यांचे नियंत्रण असते. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश — या सर्वांवर आणि त्यांच्या परिणामांवर देखील त्यांचे नियंत्रण असते. पडणारा पाऊस थांबवणे, उन्हाची सावली करणे, थंडीच्या दिवसांमध्ये थंडीचा परिणाम होऊ न देणे हे सर्व यांच्या मर्जीनुसार चालते.
माणसाची इंद्रिय हा भाग आपण समजू शकतो, परंतु माणसाचे विचार, आचार जे त्यांच्या स्वतःच्या नियंत्रणाखाली नसतात, त्या विचारांवर देखील या योग्यांचे नियंत्रण असते. एखादी घटना घडणार आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर ती घटना देखील कशा तऱ्हेने घडावी अथवा घडू नये यावर देखील त्यांचं नियंत्रण असतं.
आपल्याला अनेक लोक भेटतात. कोणाच्या मनात काय आहे हे आपल्याला कधी कळतच नाही. त्यांनी कृती केल्यानंतरच त्याचं ज्ञान आपल्याला होते. परंतु योगी लोकांना ते क्षणार्धात लक्षात येतं. त्यासाठी ती व्यक्ती समोर उभी असली पाहिजे अशी आवश्यकता नाही. ती व्यक्ती कुठेही असली तरी तिच्या मनातले विचार आणि तिच्या संभाव्य कृती यादेखील यांच्या ताबडतोब लक्षात येतात.
व्यंकटनाथ महाराज नरेंद्रशी एकदा बोलताना म्हणाले की:
“तुम्ही कसा टीव्ही पाहता; त्याच्यावर सगळं चलित चित्र आणि संभाषण तुम्हाला दिसतं आणि ऐकू येतं — त्याच प्रमाणे आम्हाला हे दृश्य दिसतं आणि ऐकू पण येतं.”
एकाच वेळी या योग्यांच्या मनामध्ये असे निरनिराळे विषय कसे चालतात किंवा कसे यांच्या लक्षात येते हे आपल्या समजुतीच्या बाहेर आहे.
—
खरं पाहिलं तर जसं आपलं शरीर आहे तसंच योग्यांच देखील शरीर असतं. त्यांचे शरीर कोणत्याही प्रकारे इतर कोणाच्याही शरीरापेक्षा भिन्न नसतं. त्यांना या गोष्टींचे ज्ञान होतं — ते आपल्याला का होत नाही? हा प्रश्न आपल्या मनात येणे स्वाभाविक आहे.
आपल्या शरीरातील इंद्रियांचा शिस्तबद्ध अभ्यास केला तर हे साध्य होऊ शकते. हा अभ्यास योग्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली होणे आवश्यक आहे. केवळ मंत्र म्हणून अथवा पोथ्या वाचून किंवा निरनिराळे व्रत करून हे साध्य होत नाही; तर तो इंद्रियांचा, मनाचा व बुद्धीचा विशेष अभ्यास आहे. हा अभ्यासात झाल्यावर योगी आपला देह कुठेही मनोवेगाने नेऊ शकतात किंवा पाहिजे तो प्रयोग कोणाच्याही शरीरावर ते करू शकतात.
—
दर्शनाला येणारे सर्वच लोक भाविक किंवा सात्विक वृत्तीचे असतात असे काही नाही. एका भक्ताने ईर्षेपायी व्यंकटनाथ महाराजांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला.
नाथ पंथातल्या जालिंदरनाथांवर देखील असाच प्रसंग ओढवला होता. सर्व कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम असे सामर्थ्य असताना त्यांना खोल खड्ड्यात घोड्याच्या लिदीमध्ये पुरण्याचा कट रचला गेला.
जालिंदरनाथ — नवनाथांपैकी एक — हे अयोनी संबंधातून प्रगट झालेले नाथ होते. गोपीचंद राजाची आई मैनावती ही जालिंदरनाथांची शिष्या होती. तिला मनापासून असे वाटते की आपला मुलगा गोपीचंद राजाच्या येण्याने जालिंदरनाथांचा अनुग्रह लाभावा. आणि त्यासाठी ती गोपीचंद राजाला समजावून सांगत होती.
मैनावतीचे बोलणे गोपीचंद राजाची राणी लुमावती हे सर्व लपून ऐकत होती आणि हे ऐकून तिला अतिशय दुःख झाले. राज्याचे सर्व वैभव राजा आणि राणी म्हणून बोलायचे सोडून नव्हते. मैनावती गोपीचंदाला जोगी व्हायला सांगत आहे, हे तिला सहन झाले नाही.
—
लुमावती व सवतींनी रचलेला कट, जालिंदरनाथांना फसवून खड्ड्यात पुरणे — ही संपूर्ण कथा जसाच्या तशी मूळ मजकुरात आहे आणि येथे तशीच ठेवली आहे.
—
यानंतर, व्यंकटनाथ महाराजांवर झालेला विषप्रयोग:
व्यंकटनाथ महाराज एकदा आपल्या शिष्याकडे अचलपूरला गेले होते. त्या शिष्याला पत्नीपासून काहीच आपत्य झाले नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले होते. दुसऱ्या पत्नीपासून दोन मुलीच झाल्या. मुलगा झाला नाही म्हणून तिसरे लग्न केले. तिसरीपासून त्याला मुलगा झाला आणि तेव्हापासून पतीचे प्रेम तिसऱ्या पत्नीवर जास्त वाटू लागले.
पहिली आणि दुसरी पत्नी — सवतबुद्धीने — तिसरीचा की महाराजांचाच काटा काढावा अशी भावना निर्माण झाली.
रोज रात्री महाराज दूध घ्यायचे. त्यांनी तिसऱ्या पत्नीला दूध आणायला सांगितले. तेव्हा पहिली म्हणाली, “तुम्ही सर्व बसा, मी गरम दूध घेऊन येते.”
ती आत गेली. Maharaj रंगात येऊन गोष्टी सांगत होते. पहिल्या बाईने दूध आणले. महाराजांनी दुधाकडे पाहिले व शांतपणे प्यायले; थोडे शिल्लक ठेवले.
एरवी उरलेले दूध प्रसाद म्हणून वाटतात, पण त्या दिवशी दिले नाही. उलट तिसरीला सांगितले:
“हे उरलेलं दूध तू तुझ्या कपाटात ठेव, कुलूप लाव. सकाळी आम्हाला आण.”
सकाळी पाहतात तर ते दूध पूर्ण हिरवेगार झाले होते!
पहिल्या बाईने कबूल केले की जीवंत पाल दुधात टाकून दूध अटविले होते. उरलेले दूध रस्त्यावर टाकले. एक कुत्रा चाटताच तो लगेच मरण पावला.
महाराजांवर विषप्रयोग झाला हे उघड झाले.
—
योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराज हे मुळातच योगी होते. त्यांच्या:
* इंद्रियांवर पूर्ण ताबा, * पोटात जाणाऱ्या दुधातील विष वेगळे ठेवण्याची क्षमता, * शरीरयंत्रणेवर पूर्ण नियंत्रण
यामुळे त्यांना काहीही झाले नाही. दूध तोंडात घेताना त्यांनी विष बाहेरच राहू दिले, आणि फक्त स्वच्छ दूध शरीरात गेले.
घरातील सर्वजण हादरले. परंतु महाराजांच्या प्रकृतीला कणभर देखील त्रास झाला नाही. कोणतेही औषध नाही, कोणतीही तक्रार नाही. त्यांचे नित्यनेमाचे जीवन सुरूच होते.