मागील काही लेखांमध्ये नाथपंथातील दैवी कार्य, सद्गुरूंचे सामर्थ्य, वेदविज्ञान, भूमी–सूर्य कार्य, गुरुगीता, भक्तांचे प्रकार आणि गुरुपदी होणाऱ्या साधकांची स्थिती यांचे विस्तृत वर्णन केले आहे. आता पुढील काही लेखांत सामान्य जीव कसा घडतो, पंचमहाभूतांचा त्याच्यावर कसा परिणाम होतो, आणि सद्गुरूंच्या कृपाछत्री येईपर्यंत तो स्वतःमध्ये स्थित्यंतर कसे घडवतो, याचे वर्णन केले जाणार आहे.
ब्रह्मांडामध्ये जन्माला येणारा आणि वावरणारा प्रत्येक जीव पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांच्या प्रभावातून जात असतो. ही तत्त्वे जीवाच्या शरीरावर, योगांवर आणि भोगांवर परिणाम करीत असतात. हा परिणाम निरंतर घडत असतो.
ब्रह्मांडातील कार्ययोजना चार युगांमध्ये—सत्य, त्रेता, द्वापार आणि कली—विभागली आहे. प्रत्येक युगाचा परिणाम प्रत्येक जीवावर होतो. त्याचप्रमाणे पंचमहाभूतांचाही परिणाम जीवावर सतत होत राहतो. आकाशतत्त्वाचा परिणाम मात्र सर्व युगांत व सर्व जीवांवर समान असतो.
जीव जन्माला आला की त्याच्या जन्मवेळेनुसार नक्षत्र व चरण पाहिले जातात. त्यावरून नावाचे आद्याक्षर ठरते. त्याचप्रमाणे जन्मवेळी ग्रहस्थिती पाहून जन्मपत्रिका तयार केली जाते. जन्मपत्रिकेवरूनच जीवाची राशी निश्चित होते.
सर्व मानवसमूह बारा राशींमध्ये विभागला जातो. या राशींचा विभाग चार महातत्त्वांनुसार केला आहे.
आकाशतत्त्व युगानुसार व जीवांच्या घटकांवर एकसमान परिणाम करते.
भारतात पंचमहाभूतांच्या स्वरूपातील शिवलिंगांची स्थाने पुढीलप्रमाणे—
बारा राशी म्हणजे त्या त्या महातत्त्वाचे निजगुण. ते गुण त्या राशीच्या लोकांच्या स्वभाव, वासना व चित्तवृत्तीवर प्रभाव टाकतात. राशी समान असली तरी योग व भोग वेगवेगळे असतात. ते पूर्वजन्मीच्या कर्मानुसार ठरतात.
पुढील लेखात आकाशतत्त्व आणि नवग्रहांचा जीवनावर होणारा परिणाम, स्वभावनिर्मिती, तसेच बारा राशींच्या लोकांचे जीवनमान व साधना यांचे वर्णन येईल. युग–तत्त्व–ग्रह–राशी या सर्वांचा परिणाम जन्मतःच दिसतो, परंतु कर्म करून जीव आपले भाग्य बदलू शकतो.
कर्मेण हरते व्याधि: । कर्मेण हरते भय: । कर्मेण हरते चिन्ता । कर्मेऽस्तु जय मङ्गलम् ।।