जालिंदरनाथांनी चांपावतीला प्रेत संस्कार झाल्यानंतर तिच्या चितेच्या राखेतून जीवंत केले, आणि ती पूर्ववत पूर्वीच्याच देहाने जीवन जगू लागली. हे तर आज देखील कुणाला शक्य नाही. हे जालिनदरनाथांचे सामर्थ्य लक्षांत घ्या. हीच ती नाथपंथाची पंचमहाभूतांवरची अबाधित सत्ता. ह्याच आबाधित सत्तेने नाथपंथ कार्य करीत आहे.
गोपीचंदाने नाथांना लिदीत पुरले त्यावेळी नाथांनी कोणताही विरोध केला नाही परंतू त्यांना बाहेर काढतांना गोपीचंदाचे प्राण पणाला लागले होते. खड्ड्यातून बाहेर काढणे जमले नाही म्हणून जालिंदरनाथ स्वतःहून वर आले.कानिफ नाथांमुळे राजाचे प्राण वाचले एवढेच नाही तर जालिंदरनाथांनी राजा गोपीचंदाला अमर केले.
जालिंदरनाथ मैनावतीचे गुरु.तिच्या अनुभावरून तिची इच्छा होती की गोपीचंदाने त्यांचा अनुग्रह घ्यावा म्हणजे आयुष्यभर त्याच्या राज्याला कोणताही धोका राहणार नाही. तिच्या सुनांना वाटले राजा संन्यास घेईल, आपल संसार उधवस्थ होईल म्हणून त्यांनी कारस्थान केले.राजाकरवी जालिंदरनाथांना मारून टकण्याचा प्रयत्न केला
सामान्य माणूस भक्त होऊन साधना,उपासना करतो. जेंव्हा गुरुकृपा प्राप्त करतो, त्यावेळेला गुरू सामान्य भाषेत सर्वांसमोर जे बोलतात त्याच वेळी ते व्यक्तिगत कांही वेगळेच सांगितात याची अनुभूती येते. नियमीतपणे साधना उपासना जन्मभर करीत राहा. हरी मुखे म्हणा,हरी मुखे म्हणा पुण्ण्याची गणना कोण करी.
माणूस ब्रह्मांड तत्त्व समजून राहिला नाही तर जीवाच्या हाल अपेष्टा होतील. हे समजून जर मानव वागला नाही तर त्याची गती त्याला दैवाधीन अशांत करून सोडेल. पूर्वसंचित प्ररब्धानुसार प्रत्येक जीव जन्माला येईल. ईश्वर त्यात कांहिच बदल करणार नाही. पण गुरु हे बदल करू शकतील.
ज्या नक्षत्रावर माणूस जन्माला येतो त्या नक्षत्राला खूप महत्त्व आहे नक्षत्रांचे गुणधर्म, पंचमहाभूतांत असलेल्या मानवी जीवनावर नक्षत्राचा कसा परिणाम होत असतो व नक्षत्रांचा त्रास होऊ नये, जीवनामध्ये दुःख कष्ट त्रास कमी होण्यासाठी आपल्या जन्म नक्षत्राची उपसना करणे आवश्यक आहे
कलियुगातल्या प्रभावी राशी म्हणजे मिथुन,तूळ,कुंभ राशी.ह्या वायुतत्त्वाच्या गुणांच्या असून त्यांचा निजगुण समता आहे. कोणत्या मंत्रांची केंव्हा व काशी उपासना करावी, ह्या राशीच्या लोकांच्या जीवनातला खडतरपणा जाऊन जीवनमान कसे चांगले होईल हे समजून घ्या. कोणते ग्रंथ वाचावे यात्रा कोणती करावी हे पहा,
मेष,सिंह व धनू ह्या तिन्ही राशी ह्या अग्नितत्त्वाच्या असून त्रेतायुगामध्ये त्या प्रभावी होत्या त्यांचा निजगुण शील आहे. ह्यांनी आपली उपसना काशी करावी म्हणजे ती प्रभावी होईल कोणते मंत्र जप ताप करून कोणते ग्रंथ वाचावे यात्रा कोणती करावी हे सांगितले आहे
29-05-22 ११२ लेखांमध्ये मी आपल्याला माह…
28-05-22 ११२ लेखांमध्ये मी आपल्याला माह…