ग्रह ग्रहण पूजा
नाथशक्तीपीठ, अकोला येथे कालसर्प दोषासह इतर अनेक ग्रहपीडांच्या निवारणासाठी 'ग्रहग्रहण पूजा' अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते. हे ग्रहग्रहण पूजा विधान हे प. पु. नरेंद्रनाथ महाराजांच्या कृपेने आणि वेदांच्या शास्त्रीय अभ्यासाच्या माध्यमातून मानवाच्या सुख शांती प्राप्ती आणि प्रगती साठी तयार केले गेले आहे. इतत्र केल्या जाणाऱ्या ग्रह शांती पूजा आणि नाथ शक्तिपीठ येथून केल्या जाणरी ग्रहग्रहण पूजा ह्या पूर्णतः वेगळ्या आहेत आणि त्याचे फळ सुधा पूर्णतः वेगळे आहे.
ग्रहग्रहण पूजा म्हणजे काय?
ग्रहग्रहण पूजा ही प्रामुख्याने मानवी जीवनातील पूर्वसंचित आणि प्रारब्धामुळे येणारे अडथळे दूर करण्यासाठी केली जाते. ज्या कोणत्या दोषामुळे जीवनात सतत क्लेश, अपयश किंवा अडथळे येतात, त्या व्यक्क्तगत दोषांचे निराकरण करणे हा या पूजेचा मुख्य उद्देश आहे.
पूजेची वेळ आणि कालावधी:
- निश्चित वार: ही पूजा प्रामुख्याने सोमवारी किंवा गुरुवारी मुहूतव पाहून केली जाते.
- मुहूर्त: तिथी, वार, नक्षत्र आणि अग्नी यांचा परस्पर योग पाहून विशिष्ट नक्षत्राला या पूजेचे आयोजन केले जाते.
- वेळ: ही पूजा सकाळी साधारणतः ७:०० वाजता सुरू होते आणि दुपारी २:०० ते २:३० वाजेपर्यंत चालते.
- हे पूजविधान साधारण पणे ११ वेगवेगळ्या पूजा प्रकारांच्या एकत्री करणाद्वारे केल्या गेले आहे.
पूजेची वैशिष्ट्ये आणि विधी:
- सहभाग: ही पूजा व्यक्क्तगत स्वरूपाची असते, परंतु पती-पत्नी एकत्र बसून ही पूजा करू शकतात. इतर धर्माचे (मुसलमान, ख्रिश्चन, जैन इ.) लोकदेखील ही पूजा करू शकतात, कारण कोणत्याही दोषांचा संबंध जातीशी नसून जीवात्म्याशी असतो.
- हवन विधी: या पूजेच्या अंतर्गत एक छोटासा हवन विधी देखील असतो, जो सर्व यजमान मिळून एकत्रितपणे पूर्ण करतात.
- विशिष्ट मंत्रविधान: नाथशक्तीपीठाने तयार केलेले विशेष मंत्रसमुच्चय, कारिका आणि संकल्प या पूजेत वापरले जातात. हे विधी केवळ नाथपंथ परंपरेच्या सिद्धतेवर आधारित आहेत.
कालसर्प दोष आणि ग्रहपीडा निवारणात भूमिका:
- राहू-केतूचा प्रभाव: कालसर्प योग हा राहू आणि केतू या दोन ग्रहांच्या स्थितीमुळे निर्माण होतो. ग्रहग्रहण पूजेच्या माध्यमातून या ग्रहांची पीडा, महादशा किंवा अंतर्दशा यातील अशुभ फळे दूर केली जातात.
- मानसिक परिणाम: पूजेचा संकल्प केल्यापासूनच यजमानाच्या मानसिकतेत बदल होऊ लागतो आणि पूजेनंतर साधारण सव्वा वर्षाच्या कालावधीत अपेक्षित फलश्रुती अनुभवास येते.
- अनाकलनीय अडथळे: नोकरीतील त्रास, आर्थिक हानी, कोर्ट-कचेरी आणि संततीदोष यांसारख्या कालसर्प दोषाच्या लक्षणांवर ही पूजा प्रभावी ठरते.
समाजाला होणारे फायदे:
- आत्मविश्वास वाढणे: सुस्त आणि अकार्यक्षम व्यक्तींमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते.
- कौटुंबिक शांती: घरातील कलह दूर होऊन सुख-समाधान प्रस्थापित होते.
- मुलांच्या प्रगतीसाठी: अभ्यासात लक्ष नसलेल्या किंवा मतिमंद असलेल्या मुलांच्या प्रगतीसाठी या पूजेचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.
- भाग्याचे पुनरुज्जीवन: वेदमंत्रांच्या माध्यमातून प्रारब्धातील दोष दूर करून 'भाग्याचे पुनरुज्जीवन' करण्याचा अनुभव १०,००० हुन अधिक भाविकांनी घेतला आहे.